अतिरिक्त आणि सदोष वीज बिल पाठवून ग्राहकाला त्रास देणार्या महावितरणला ग्राहक आयोगाने चांगलाच चाप लावला आहे. मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका महत्त्वपूर्ण निकालात तक्रारदार महिलेला आलेले सदोष वीज बिल व त्यावरील दंडव्याज रद्द करण्याचे आदेश दिले असून, 5,000 रुपयांची नुकसानभरपाई 45 दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. भोकरदन तालुक्यातील तांदूळवाडी येथील निर्मलाबाई भुजंगराव पाटील यांना अवास्तव बील पाठविले होते.