जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पारंपारिक पद्धतींऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, या मागणीसाठी ‘इग्नायटेड इंडियन माईंड्स’ या संस्थेचे संस्थापक हर्षल व्यवहारे यांनी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गुरुवार दि. 12 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी ‘जटायू’ कचरा संकलन यंत्राचा वापर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.