भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे दि. 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देत शैक्षणिक, प्रशासकीय आणि भौतिक सुविधांची सर्वांगीण पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रोज वाचनाची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती आहे. प्रत्येक मुलाने पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.