शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू आहे दरम्यान हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे, धनगर समाजाचे बाळासाहेब जानराव,मनसेचे सुनील गायकवाड यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाला निवेदन दिले या निवेदनात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आमदार खासदार यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.