शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस स्थानक ते गांधी चौक परिसरातील अतिक्रमणांवर आज 19 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भंडारा नगरपरिषदेने आपला मोर्चा वळवला. गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, हातगाडे आणि फलकांवर पालिकेने धडक कारवाई करत हा मुख्य मार्ग अतिक्रमणमुक्त केला. या कारवाईमुळे रस्ते रुंद झाले असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.