सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा आ. कराड यांची पणन मंत्र्याकडे मागणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे लातूर जिल्हयात सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल साहेब यांच्याकडे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी एका पत्राद्वारे केली आहे.