हिंगणघाट: सततच्या संततधार पावसाने झालेल्या शेतपिकाची तात्काळ नुकसान भरपाई द्या:शेतकरी संघटनेची मागणी
हिंगणघाट:मागील दोन महिण्यापासुन संततधार पाउस पडत आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह खरडुन गेले तसेच अज्ञात रोगाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक पिवळे पडलेले आहे.या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने तहसीलदामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात संततधार पावसाऊस सुरू आहे.