बैलवाडा जवळ असलेल्या सावर मेंढा या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाले. भीमराव केने यांचे हे वासरू होते. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सावरमेंढा चे सरपंच अमोल केणे व बैलवाड्याचे सरपंच निकिता शेटे यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याची आव्हान केले आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील जपून शेतात जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे