महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झाले असले तरी राज्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने गारठा जाणवू लागला आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबरला जिल्ह्याचे तापमान 9.6 अंश असल्याची नोंद प्रशासनाकडून घेण्यात आली. हे तापमान या महिन्यातील सर्वात कमी आहे यामुळे यवतमाळकर चांगलेच गारठले आहे.