सुधागड: महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून चार दुधाळ जनावरांचा मृत्यू
जांभूळपाडा विजयनगर येथील दुर्घटना
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीज वाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी व एक गाय मरण पावल्याची घटना शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे यात दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची घटना ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.