ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या विविध विकास योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल यंत्रणा व जिल्हा परिषद यांच्या प्रभावी समन्वय आवश्यक असतो. हा समन्वय साधून अनेकांचे प्रशासनाशी निगडित असलेले प्रश्न गाव पातळीवरच मार्गी लावण्याची निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. यानुसार उमरेड येथे सात मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.