जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणूकाचे निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे कौतुक सोहळे साजरे होत असतानाच जालना आणि अंबड शहरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हे रात्री उशीरा अचानक आदेश जारी केलेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी जालना येथील दीपक भिमराव बोर्हाडे हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसण्याच्या तयारीत सुरू होती.