स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परतुर तालुक्यातील श्रद्धा एनर्जी इन्फ्रा प्रा ली.(बागेश्वरी) साखर कारखान्यावर मागील हंगामातील ऊसाच्या २३३ रुपये थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी तसेच चालू हंगामात गाळपास जाणाऱ्या उसाला एक रकमी ३२०० रुपये दर मिळालाच पाहिजे. मोर्चा काढण्यात आला.यावेळी राजू शेट्टी मोर्चाला फोनद्वारे मार्गदर्शन केले. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.