नागभिर: आक्कापुर येथील शेतकरी संघटनेचे वाघाच्या बंदोबस्त साठी वनविभागाला निवेदन
नागभीड तालुक्यातील आकापूर येथील एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्यानंतर येथील नागरिक संतप्त होऊन वनविभागावर रोष व्यक्त करत आहे आकापूर येथे वाघाचे वास्तव्य असल्याचे बाब नागरिकांनी वनविभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही वनविभाग वाघाला पकडू शकत नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहे वाघाच्या बंदोबस्त साठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने वनविभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे