राजुरा तालुक्यातील बाबूपेठ ते सास्ती या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू होत आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राजपत्रही प्रकाशित केले आहे. मात्र, मौजे मानोली बु., मोजा कढोली बु. व मौजे गोवरी या गावातील नागरिकांचा विविध कारणास्तव जमीन अधिग्रहणास विरोध आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून जमीन अधिग्रहणासाठी प्रस्तावित भागातील भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर चर्चा केली.