राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत विरार येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या हेतूने हा जनता दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार राजन नाईक आमदार, स्नेहा दुबे पंडित, संबंधित अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.