स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि तिचे अधिकार मान्य करणे हाच खर्या अर्थाने महिला दिनाचा उद्देश आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही समान असून त्यांच्या कष्टांचा आणि कमाईचा हक्कही समान असायला हवा. हे समाजाने स्वीकारले तरच प्रगतीचा गाडा पुढे जाईल, असे प्रतिपादन जालना येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय स्त्रियांचे आरोग्य, आव्हाने व उपाययोजना या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.