जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना सहा जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव रिपाइंतर्फे भाजपकडे सादर करण्यात आला. शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात माहिती देताना अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा महायुतीचा घटक पक्ष आहे.