शहरातील टागौर चौकातील ट्युबवेल बंद पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. बंद पडलेली ट्युबवेल दुरुस्ती करून पाणी मिळावे अशी मागणी प्रभाग क्रमांक १० व ११ मधिल नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्याकडे दिनांक १२ डिसेंबर ला देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.