काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की “मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस या दोन स्वतंत्र संघटना आहेत. स्थानिक पातळीवर जो काही निर्णय घेतला जातो, तो स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या संमतीनेच केला जातो.” पटोले म्हणाले की, हे फक्त काँग्रेसमध्येच घडते असे नाही, तर भाजपमध्येही संपूर्ण महाराष्ट्रात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस असो वा शिवसेना, एकमेकांमध्ये भांडण सुरू असल्याचे आपण पाहत आहोत.