निंबा येथे दि.25 ऑक्टोबर पासून पावसाने चांगलाच थैमान घातल्यामुळे कापणी झालेल्या धान पिकाचे आणि बांध्यात उभे असलेले पीक जमीनदोस्त होऊन प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शासनाकडे मदतीची आस लावून बसला आहे.ग्राम पंचायत निंबा मधील शेतकऱ्यांच्या धान पिकाचे झालेल्या नुकसानाची दखल घेत सरपंच वर्षा पटले यांनी महसूल अधिकारी दीक्षा वाकले कृषी सहायक उमेश मडावी व ग्राम विकास अधिकारी विलास सूर्यवंशी यांना नुकसानीबाबत कळविले दि.28 ऑक्टोबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली.