गोरेगाव: जिल्ह्यातील 2309 हेक्टरमधील पिकांना फटका, नुकसानीचा अंतिम अहवाल तयार,3 कोटी 50 लाखांची मागणी,6398 शेतकरी झाले बाधित....
गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार करून शासनाकडे पाठविला आहे. यात 2309 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील 6398 शेतकरी बाधित झाले. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तीन कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली आहे.