धुळे शहरालगतच्या चित्तोड–रावेर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रावेर, दह्याने, बह्याने, अजनाळे गावांतील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार अपघात घडत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.