जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात राज्य सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर थेट हल्ला चढवीत भाजपाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी तपास जाणीवपूर्वक मंदावला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपींची नावे आणि पत्ते माहीत असतानाही प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल होत नसल्याने या तपासाबाबत मोठा संशय उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.