12 मार्च ला संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत 'अवैध भोंगे' हटवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. विनापरवाना असलेले अवैध भोंगे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.याबद्दल ची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.