डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. भीमसैनिकांची ही भाविकांची गर्दी थंडीच्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री थांबते. अशा वेळी त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, उबदार साथ मिळावी यासाठी सामाजिक उपक्रम राबवले जातात. शनिवार दि. 6 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यामधील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे अंजनी फाउंडेशनतर्फे मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने राबविला जातो.