आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या डोमेगाव आणि साळेगाव नेर येथे झालेल्या दमदार पावसाचा कापूस पिकाला फटका बसला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. मागील 2 दिवसांपासून जालना, अंबड आणि जाफराबाद तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. या पावसाचा वेचणीस आलेल्या कापसाला फटका बसला असून वेचणीस आलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडले असून त्य