जालना येथील संत रामदास मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट भोजनाची तक्रार केल्याच्या कारणावरून एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला गरम उलथण्याने मारहाण केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.रविवार दि.18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वा. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.मिळालेल्या माहितीनुसार,वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत विद्यार्थ्याने गृहपालांकडे तक्रार केली होती.