तालुक्यातील मौजा जुवाडी येथे ईगल कंपनी प्रा.लि. द्वारे उभारण्यात आलेल्या सिमेंट मिक्सर प्लांटमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः धूळधाण उडाली आहे. या प्लांटमधून दिवस-रात्र माल वाहतुकीसाठी धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे जुवाडी ते वडगांव मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, नागरिक आणि शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी ता. १३ गुरुवारला दुपारी २ वाजता सेलू तालुका शिवसेना (उबाठा) यांनी तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देऊन केली आहे.