बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून, यात एमआयएम पक्षाने लक्षणीय कामगिरी केली आहे. पक्षाने बिहारमध्ये एकूण पाच जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमच्या या यशानंतर महाराष्ट्रातील धुळे शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.