धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील सुभाष नगर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे जुने धुळे विभाग शिवसेनेने महापालिकेचे लक्ष वेधले आहे. गायकवाड चौक ते आदिवासी वस्ती व एकवीरा देवी पुलाकडे जाणारा रस्ता दहा वर्षांपासून दुर्लक्षित असून खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. तातडीने निधी देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.