जालना तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात प्रलंबीत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असून तात्काळ जन्म प्रमाणपत्र जारी करावेत अशी मागणी नागरीकांनी केली. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही नागरीकांनी दिलाय. शुक्रवार दि. 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाला नागरीकांनी निवेदनही दिले आहे.