समुद्रपूर: खुर्सापार जंगलातील त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी
वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील वनविभाची टिम राबविणार सयुक्त मोहीम
गिरड खुर्सापार परिसरात गेल्या ११ महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या एक वाघीण तिन पिल्ले आणि एक वाघा अशा ५ वाघांनी शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केले असून आतापर्यंत या वाघांनी कोणत्याही मनुष्याला इचा पोहचवली नसली तरी शेकडो पाळीव जनावरांना ठार केले आहे.त्यातील एका वाघा ३१ डिसेंबरपर्यंत जेरबंद करण्याची परवानगी मिळाली आहे. वन विभागाकडून या वाघा जेरबंद करण्यासाठी युध्द पातळीवर पर्यंत सुरू आहे.