अंबाजोगाई: अंबाजोगाईत विद्यार्थ्यांने गळफास घेऊन वस्तीग्रहात आत्महत्या केली
अंबाजोगाई शहरातील एका वसतिगृहात ११ वीच्या वर्गातील आरुष चौरे या तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समजताच भागामध्ये एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरुष चौरे याने नुकताच ११ वी वर्गात प्रवेश घेतला होता आणि शिक्षणासाठी शहरातील एका वसतिगृहात राहत होता. त्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.