दिल्ली येथे माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जेपी नड्डा आणि महाराष्ट्राचे माननीय आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ‘जनऔषधी’ व ‘अमृत फार्मसी’ केंद्रांचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वस्त व दर्जेदार औषधे उपलब्ध होऊन उपचार खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.