जालना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असून, त्या कालावधीत निवडणुका होण्याची शक्यता कमी असल्याने गावकारभार सुरळीत चालवण्यासाठी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता हे निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर पंचायत समितीतील विस्तार अधिकार्यांना प्रशासक म्हणून नेमले जाते. मात्र एका अधिकार्याकडे जास्त गावे असतात.