जालना: सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प; शेतकरी, युवक, महिला आणि मध्यमवर्गाला दिलासा - आमदार बबनराव लोणीकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सादर झालेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असून ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेचा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पाचे स्वागत करत त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.