गडचिरोली: शहरात जड वाहनांना प्रवेश करण्याची वेळ निश्चित करून वाहतूक नियंत्रित करा विश्वजीत कोवासे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे गडचिरोली-आल्लापल्ली महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असून, अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या परिवाराला भरपाई द्यावी, व गडचिरोली शहरात जड वाहनांना प्रवेश करण्याची वेळ निश्चित करुन वाहतूक नियंत्रित करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.