राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार. शेतकऱ्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.