विविधतेत एकता भाषावार प्रांतरचना हा आपल्या देशाचा कणा कळीचा मुद्दा आहे. यातूनच देशाने आजपर्यंत वाटचाल केली, मात्र या दोन गोष्टी मोडून काढायला निघालेल हे सरकार आहे. विविधता न ठेवता एकता करणे, आम्ही सांगू ते करा त्याप्रमाणे वागा असे सांगणारे सरकार विविधतेतील एकता मोडून काढायला निघाल आहे. त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे शिक्षण अभ्यासक गिरीश सावंत यांनी सांगितले आहे.