भंडारा शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे मागील अनेक वर्षांपासून रखडलेले काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याच्या मागणीसाठी १२ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. परिणय फुके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. भंडारा शहरवासीयांना दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा व गैरसोयीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन, ही योजना युद्धपातळीवर व काळमर्यादेत.