गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली आणि बहुचर्चित नेरूळ-मुंबई प्रवासी फेरी सेवा अखेर १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे सिडकोने विकसित केलेल्या नेरूळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलला पूर्णपणे कार्यान्वित करण्याची संधी मिळणार आहे. या नवीन जलवाहतूक सेवेमुळे नेरूळ ते भाऊचा धक्का हा प्रवास जलद गती घेणार आहे.