शाहूवाडी: वारणा धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जलाशय परिचलन योजनेनुसार धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग वाढविण्याचा निर्णय वारणा धरण प्रशासनाने घेतला आहे.अशी माहिती आज मंगळवार दिनांक आठ जुलै सायंकाळी चार वाजता वारणा धरण व्यवस्थापकांकडून देण्यात आली.