स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या आणि देशाला घडवणार्या कर्तबगार ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन, या देशाला खर्या अर्थाने वैभवशाली बनविण्यासह स्वातंत्र्य व लोकशाही टिकवण्याची नैतिक जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय विभागीय सचिव तथा जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केले. सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील टिपू सुलतान चौकात ध्वजारोहण प्रसंगीते बोलत होते.