Public App Logo
Profile Picture

द महाराष्ट्र न्यूज

@dgiri8187
299Followers
0Following
📍बुलेट चालकांनो सावधान 
📍लातूर शहरात फटाका वाजवणाऱ्या बुलेट चालकांवर होणार तब्बल 20,000 रु पर्यंतची दंडात्मक कार्यवाही
📍क्लासेस वाल्याना दादा भुसे यांचा दणका.
<nis:link nis:type=tag nis:id=facebookvideo nis:value=facebookvideo nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=dadabhuse nis:value=dadabhuse nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookreels nis:value=facebookreels nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/>
📍 सोशल मीडिया वरती सध्या रूपाली चाकणकरांची चर्चा जोरात.
<nis:link nis:type=tag nis:id=facebookviral nis:value=facebookviral nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=facebookreelsviral nis:value=facebookreelsviral nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=rupalichakankar nis:value=rupalichakankar nis:enabled=true nis:link/>
📍ही वेळ पालिकेवर आली कशा मुळे कुणी लातूर करांना सांगेल..?
📍तुम्हाला काय वाटत ते कंमेंट करून सांगा.
<nis:link nis:type=tag nis:id=facebookreelsviral nis:value=facebookreelsviral nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cjp nis:value=cjp nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cmomaharashtra nis:value=CMOMaharashtra nis:enabled=true nis:link/>
📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुर शहरात सुरु होणार हेल्मेट शक्ती.
हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.
 <nis:link nis:type=tag nis:id=facebookreelsviral nis:value=facebookreelsviral nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturpolice nis:value=LaturPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookvideo nis:value=facebookvideo nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=usehelmet nis:value=usehelmet nis:enabled=true nis:link/>
Video 6
📍सार्वजनिक ठिकाणी धारदार कत्ती बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

विवेकानंद चौक पोलिसांची कारवाई; शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल, कत्ती जप्त

लातूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. याच अनुषंगाने विवेकानंद चौक पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारदार कत्ती बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कारवाई करून त्याच्याकडून लोखंडी कत्ती जप्त केली.

दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कृपा सदन रोड, हरिभाऊ नगर परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता जुन्या वापरत्या लाकडी मुठीसह लोखंडी धारदार कत्ती आढळून आली.

चौकशीदरम्यान संबंधित तरुणाकडे सदर शस्त्र बाळगण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ऋषीकेश भगवान सातपुते (वय २०, रा. पिंटू हॉटेल, लातूर) याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०१/२०२६ अन्वये कलम ४ व २५ शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ व्ही. डी. सूर्यवंशी यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ डी. यू. हावा करीत आहेत.

शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
📍कायद्याचे पालन करून चांगला माणूस बना : समीरसिंह साळवे (DYSP) लातूर 

लातूर : “चांगला विद्यार्थी होण्याबरोबरच कायद्याचे पालन करून जबाबदार नागरिक आणि चांगला माणूस बना,” असे आवाहन लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी विद्यार्थ्यांना केले.

लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमांतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

“कायदा हा केवळ दंड देण्यासाठी नसून समाजात शिस्त, सुरक्षितता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेण्यासोबतच कायद्याचे पालन करावे,” असे साळवे यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा, वाहतूक नियम, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, छेडछाड व विनयभंग, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर तसेच रस्त्यावर केक कापण्यासारख्या धोकादायक प्रकारांबाबत कायदेशीर तरतुदी व परिणामांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पर्यवेक्षक डॉ. सुधीर जाधव व प्रा. सुदर्शन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी तक्रार पेटीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी केले.

कार्यक्रमास कला, वाणिज्य, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. माधव शेलके यांनी केले, तर आभार डॉ. सुधीर जाधव यांनी मानले.

‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागृती, सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न लातूर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
📍वो हमारे 'नवाजीश को साजिश' समझ बैठे,

मुस्लिम मराठी 'प्रबोधनकार' कमी असल्याने समाजाचा खूप  नुकसान -मोहसीन खान
ईद-ए-मिलादुन्नबी आणि ज्ञानप्रकाश रौप्य महोत्सवानिमित्त विविध विषयावरती वक्तृत्व ' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा 'समाज रत्न' म्हणून पुरस्कार धाराशिव तालुका कळंब येथे देण्यात येत त्यामध्ये लातूरचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे मोहसीन खान यांना ते पुरस्कार घोषित झालं होतं स्वर्गीय सलीम भाई मिर्झा यांच्या नावाने हा पुरस्कार 'समाज रत्न' म्हणून दरवर्षी   देण्यात येते आणि यंदाचा पुरस्कार मोहसीन खान यांना जाहीर झाला होता.
मोहसीन खान यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण करणे अल्पसंख्यांक समाजासाठी विविध प्रकारच्या आंदोलन करणे मेळावे घेणे प्रबोधन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक या विषयावर मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण हे राज्यव्यापी आंदोलन चालवणे वक्फ मंडळ आणि सामाजिक मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करून शासन दरबारी आपली वेगळी ओळख निर्माण करणारे एक मुत्सद्दी कार्यकर्ता नाव म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती,शिव शाहू फुले टिपू यांच्या विचारांनी समाजात प्रबोधन करणे, पीडित शोषित गरजवंत विद्यार्थ्यांसाठी काम, रक्तदानाची चळवळ उभी करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कणखरपणे उभे राहणे आदी  उपक्रम त्यांनी लातूर व संपूर्ण राज्यभर राबविले आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोक मोहेकर सर, प्रतापजी पाटील, अजित दादा, पिंगळे राजेंद्र आबा मुंडे, मिर्झा मुख्तार मिर्झा होते तर प्रमुख वक्ता म्हणून माननीय अविनाश भारती हे उपस्थित होते, व विविध पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 'राज्यामध्ये मुस्लिम मराठी प्रबोधनकार कमी असल्याने समाजाचा खूप मोठा नुकसान झालं व हमारे 'नवाजीश को साजिश' समज बैठे आम्हाला आमच्या समस्या ठेवायच्या होत्या पण ते मराठीत व्यवस्थित न मांडता आल्याने शासन प्रशासन राजकीय पक्ष यांना ते समजलच नाही म्हणून समाजाच्या समस्या कळल्याच नाही म्हणून मराठी समाजातल्या सर्व घटकांमध्ये आणि विशेष म्हणजे मुस्लिमांमध्ये घराघरात रुजली पाहिजे जेणेकरून नवाजीश आणि साजिश यातलं अंतर फरक लक्षात येईल पूर्वी आम्हाला चळवळ चालवीत असताना एखादा वक्ता हुडकून आणावा लागायचा पण आता आधुनिक मोबाईल,टेक्नॉलॉजी आणि विविध क्षेत्रात काम करणारी वक्ते मंडळी निर्माण झाली आहे म्हणून 'वक्तृत्व ' हे खूप महत्त्वाचे ठरले गेलेले आहे असे परखड मत मोहसीन खान यांनी व्यक्त केले. मोहम्मद पैगंबर दिनानिमित्त 
'मोहम्मद पैगंबर यांचे महिला यांच्या  विषयीचे विचार समता सन्मान आणि अधिकार' 
'मोहम्मद पैगंबराचे विचारांची आजच्या काळात गरज'
'शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज शैक्षणिता समन्वय आणि सर्वधर्मसमभाव' आदी विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी 'आगाज ' फाउंडेशन अध्यक्ष,अकिब नय्युम पटेल - 
कार्तिक शंकर इंगळे- उपाध्यक्ष
मुस्तान मुख्तार मिर्झा- सचिव
इमरान जफरखान पठाण- सहसचिव,अक्षय सिद्धार्थ गायकवाड- कोषाध्यक्ष
शफिक महमूद शेख- कार्याध्यक्ष
ज्ञानेश्वर नरटे-खजिनदार
खादिम सय्यद- प्रसिद्धी प्रमुख
Adv. विश्वजित बाळासाहेब दुगाने- सल्लागार,Adv. अमर बाबासाहेब पायाळ- सल्लागार,Adv. रामेश्वर बालाजी दारशेवाढ- सल्लागारकार्यक्रमाचे प्रस्ताविक मुस्तान मिर्झा यांनी मांडले तर आभार अकीब पटेल यांनी व्यक्त केले.
*वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती*.
आपला 
मोहसीन खान
📍देशी दारूची वाहतूक करणारा ताब्यात

२३ बॉक्समधील २,३०० बाटल्या आणि आल्टो कार असा २.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर : जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध लातूर पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. मांजरा कारखाना ते चिंचोली जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून देशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २३ बॉक्समधील २ हजार ३०० बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आल्टो कार असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांजरा कारखाना ते चिंचोली रस्त्यावर सापळा लावला होता. सकाळी सुमारे ७.४० वाजता एमएच-२४-सी-७९५४ क्रमांकाची आल्टो कार संशयावरून थांबवून चालकाची चौकशी व वाहनाची झडती घेण्यात आली.

यावेळी कारमध्ये खाकी रंगाचे २३ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० एमएल क्षमतेच्या ‘सिमला संत्रा’ देशी दारूच्या १०० सिलबंद बाटल्या असल्याचे आढळले. एकूण २ हजार ३०० बाटल्यांची किंमत ९२ हजार रुपये, तर दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या मारुती सुझुकी आल्टो कारची किंमत १ लाख ५० हजार रुपये असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत बालाजी प्रभाकर दुडलेवार (वय ४३, रा. शर्मा नगर, औराद, ता. निलंगा, जि. लातूर; सध्या रा. महादेव नगर, १२ नंबर पाटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. दारूची वाहतूक अथवा विक्री करण्यासाठी कोणताही वैध पास किंवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५(अ)(ई), ८१ व ८३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज भारत खोसे, विजय पाटील आणि प्रविण कोळसुरे यांचा समावेश होता.

जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक आणि इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
📍हे कितपत योग्य तुमचं मत नक्की कमेंट करा
📍लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर पण महापालिका सत्ताधारी आपले आर्थिक  हितसमंध जोपसण्यात मग्न, त्यामुळे च मनपा सत्ताधारी लातूरकरांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास अ समर्थ असल्याचे -गणेश गवारे भाजपा नगरसेवक.
📍लातुरातील कचरा वेवस्थापण करणाऱ्या कंत्राट दाराचे कंत्राट रद्द करण्यासाठी गणेश गवारे भाजपा नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त यांना दिले निवेदन.
📍ग्रामीण मतदार संघातील ३९ हजार लाभार्थ्यांना 
मिळणार हक्काचे घर - आ. रमेशआप्पा कराड

लातूर दि. २४ - स्वतःच्या हक्काचे घर असावे या अपेक्षेने अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३९ हजार पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच टप्प्या टप्प्याने हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
       प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. गरीब गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावातील आणि वाडी वस्तीतील पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असून घराच्या प्रतिक्षेत असलेल्या कुटुंबांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे. 
         गेल्या मार्च २०२५ पूर्वी त्या त्या गावातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबाचा ग्रामसेवकांनी सर्व्हे करून शासनाच्या निकषानुसार याद्या तयार करण्यात आल्या. १५ ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित त्या त्या गावातील ग्रामसभेत सदरील लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करून मान्यता देण्यात येत आहे असं सांगून भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लातूर तालुक्यात २२ हजार ३००, रेणापूर तालुक्यात ११ हजार ५६० आणि भादा सर्कल मध्ये ५ हजार २६ तर रेणापूर शहरातील ४५० याप्रमाणे लातूर ग्रामीण मतदार संघात एकूण ३९ हजार ३३६ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना ग्रामसभेत मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
         ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगून भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या वर्षी लातूर तालुक्यात ८ हजार ५८१, रेणापूर तालुक्यात ४ हजार ६३३, रेणापूर शहरातील १ हजार १०२ आणि भादा सर्कल मधील ३ हजार ३५२ असे एकूण १७ हजार ६६८ लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले त्यातील अनेकांनी घराचे बांधकाम केले काही जणांची प्रगतीपथावर आहे.
        घरकुल पासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. आ. कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण मतदार संघात तब्बल ३९ हजार ३३६ कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार होत असून घरकुल मंजूर झाल्यावर निश्चितपणे या पात्र लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहावयास मिळेल.
📍सरकारच्या पाया खालची वाळू सरकली.
📍औसा येथे अभिजित दिपकेवर गुन्हा दाखल.
📍आता बोंबला.
रात्री पतीसोबत, दिवसा प्रियकरासोबत राहण्याची महिलेची मागणी; पोलिसही चक्रावले!

एका विवाहित महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तिने त्या तरुणाशी लग्न केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिच्या पतीने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणानंतर महिलेने पोलिसांसमोर एक वेगळीच मागणी मांडली.

महिलेने दिवसा प्रियकरासोबत तर रात्री पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तिने पोलिसांकडे लेखी अर्जही सादर केला. पती-पत्नी आणि प्रियकर असे तिघेही पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

या प्रकरणात तिघांनीही एकत्र राहण्याची तयारी दर्शवली होती; मात्र आपला पती आणि सासरचे लोक यासाठी तयार नसल्याचे महिलेने सांगितले. तिच्या या अनोख्या मागणीने पोलिसही चक्रावल्याचे वृत्त आहे.

हे प्रकरण सीतापूरच्या महमूदाबाद कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचल्याचे वृत्तात नमूद आहे. या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=प्रेमप्रकरण nis:value=प्रेमप्रकरण nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पोलिसठाणे nis:value=पोलिसठाणे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उत्तरप्रदेश nis:value=उत्तरप्रदेश nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookviral nis:value=facebookviral nis:enabled=true nis:link/>
📍छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकृत केलेल्या मुली निर्भीड आणि स्वाभिमानी, संयमी असतात.
📍मराठमोळी शिवकन्या रुपाली पाटील.
📍लातूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी महेश हिप्परगे यांची सर्वानुमते निवड

सरचिटणीसपदी रवी उदगीरकर, तर कोषाध्यक्षपदी उमेश सांगळे यांची निवड
📍शेतकऱ्यांच्या संतापाचा लातूर लांमजना महामार्गावर उद्रेक ;
  📍पावसाची दडी शेतमालाला भाव नाही वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या बोजा आणि त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक झाला लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.       <nis:link nis:type=tag nis:id=शेतकरी nis:value=शेतकरी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=baliraja nis:value=baliraja nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=क्रांतिकारी nis:value=क्रांतिकारी nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=shetkariaandolan nis:value=ShetkariAandolan nis:enabled=true nis:link/>
📍तुम्हाला वाटत का राहुल गांधी नीं मनुस्मृती ग्रन्थ वाचला असेल....?

<nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookviral nis:value=facebookviral nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebooknonfollowers nis:value=facebooknonfollowers nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=punekar nis:value=punekar nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=rahulgandhivoiceofindia nis:value=RahulGandhiVoiceOfIndia nis:enabled=true nis:link/>
📍 आता चिंता मिटली 
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी साखरेचा अचानक भाव वाढी मुळे सामान्य जनतेच्या भावना समजून घेत खाण्याची आणि व्यवसायिक साखर दाराबाबत केंद्र सरकार ला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
📍महापौरांना पडला विसर लातूर
📍महानगरपालिका प्रचंड आर्थिक अडचणीत 
 📍लातूर महानगरपालिकेच्या महापौर यांच्या डालनाचे सहा महिन्यात नूतनीकरण.
📍 लातूरकरांच्या पैशाची ही उधळपट्टी थांबणार की नाही. <nis:link nis:type=tag nis:id=facebookreels nis:value=facebookreels nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookvideo nis:value=facebookvideo nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nonfollowers nis:value=nonfollowers nis:enabled=true nis:link/> # <nis:link nis:type=tag nis:id=laturcity nis:value=LaturCity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=eknathshinde nis:value=EknathShinde nis:enabled=true nis:link/>
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने  लामजना  येथे भव्य रास्ता रोको आंदोलन
📍उदगीरमध्ये ₹२,१४३ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ!
आयकर विभागाच्या कारवाईनंतर CA श्याम शिवप्रसाद कलानी आणि संलग्न १६ कंपन्यांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफरीचे आरोप करण्यात आले असून, उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
₹२,१४३ कोटींचे संशयास्पद व्यवहार, कंपन्यांमधील कथित संगनमत आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
या कथित महाघोटाळ्यामागचे सत्य तपासातूनच समोर येणार!
<nis:link nis:type=tag nis:id=उदगीर nis:value=उदगीर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=लातूरउदगीर_ब्रेकिंग nis:value=लातूरउदगीर_ब्रेकिंग nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=महाघोटाळा nis:value=महाघोटाळा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आयकरविभाग nis:value=आयकरविभाग nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookreels nis:value=facebookreels nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=folowers nis:value=folowers nis:enabled=true nis:link/>
📍भारत साखरेची आयात करणार.
<nis:link nis:type=tag nis:id=bharat nis:value=bharat nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=facebookpost nis:value=facebookpost nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=folowers nis:value=folowers nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=pmoindia nis:value=PMOIndia nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nonfollowers nis:value=nonfollowers nis:enabled=true nis:link/>