माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधारी भाजप आणि आयोगाच्या साट्यालोट्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "राजीव गांधींनी घटनादुरुस्ती करून निवडणूक आयोगाला जी स्वायत्तता दिली होती, ती आता पूर्णपणे संपली असून निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे," असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला.