आज दि ६ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५:३० वाजता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केले आहे.मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम राजीनामा देणारा मीच असल्याचे त्यांनी सांगितले.आज मात्र माझ्या अस्तित्वाची लढाई सुरू असल्याचे म्हणत समाजाने पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.मराठा समाजाच्या हक्कांसाठी मी नेहमीच संघर्ष केला असून तो पुढेही सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.