अजित पवारांनी संशोधक व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेली वक्तव्ये ही मनुवादी मानसिकतेची असून त्यांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावे, अशी घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. “पीएचडी करून काय दिवे लावणार?” आणि “पैसे मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील पाच-पाच जण पीएचडी करतात” अशी विधाने ही लोकप्रतिनिधीला शोभणारी नाहीत, असे ते म्हणाले. राज्यात 65 हजार मराठी शाळा बंद, 11 हजार प्राध्यापक पदे रिक्त, विद्यापीठांत 60 टक्के शिक्षकांची कमतरता. असेही पातोडे म्हणाले.