शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत असून, सरसकट कर्जमाफीऐवजी गरीब व दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तालुक्यातील जेहुर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी महायुती सरकार प्रभावी योजना आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.