आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील सुभाषनगर येथील शेतकरी पांडुरंग शंकर राठोड वय 45 यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 18 नोव्हे स 10 वाजता सुमारास उघडकीस आली.मागील काही वर्षांपासून सततची नापिकी,वाढता कर्जबोजा या आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकांनी सांगितले,बँक ऑफ महाराष्ट्र या बँक शाखेचे पीककर्ज आणि खाजगी सावकारांचे कर्ज अशा दुहेरी आर्थिक दबावामुळे राठोड हे गंभीर संकटात सापडले होते.आज सकाळी कुटुंबियांना